रंगपंचमी वर मराठी निबंध – Rang Panchami Essay In Marathi

Rang Panchami Essay In Marathi

रंगपंचमी होळीच्या सणाच्या ५ दिवसांनंतर साजरी केली जाते जो हिंदूंचा मौजमजेचा आणि रंगांचा सण आहे. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तर भारतातील इतर भागांमध्ये हा भारतातील महत्त्वाच्या सणांपैकी एक मानला जातो. हिंदू आणि ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, हा सण कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी, फाल्गुन महिन्यातील चंद्राच्या घटत्या टप्प्यात साजरा केला जाईल.

मुळात ‘रंग’ या शब्दाचा अर्थ ‘रंग’ असा होतो आणि ‘पंचमी’ म्हणजे पाचवा दिवस, त्यामुळे होळीचा सण पाचव्या दिवसानंतरच साजरा केला जातो. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की रंगपंचमी म्हणजे नक्की काय!, Rang Panchami Essay In Marathi हे होळीसारखेच आहे आणि लोकांवर गुलाल टाकून आणि रंगीत पाण्याचा शिडकावा करून साजरा केला जातो.

रंगपंचमी खेळताना | Rangpanchami Essay In Marathi

फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे ‘रंगपंचमी’.

‘रंगपंचमी’ हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात. नाना विविध रंगाची उधळण करायची आणि एका आगळ्या वेगळ्याच स्वानंदाच्या रंगांत रंगून जायचे हे साधायचं असत ह्या सणाच्या साजरेपणात.

रंग.. खरंच प्रत्येक रंगाला एक अर्थ असतो. प्रत्येक रंगाची एक शिकवण असते. पांढरा रंग शांततेचा, लाल रंग त्यागाचा, हिरवा रंग समृद्धीचा. रंगांच्यामुळेच आपले जीवन हे सुद्धा रंगीन होते. गोकुळांत श्रीकृष्णाबरोबर गोप-गोपिकांनी जी रंगपंचमी साजरी केली, त्या रंगपंचमीला होता एक रंग भक्तीचा. आपल्या स्वातंत्र्य वीरांनी, क्रांतीकारकांनी, देशभक्तांनी स्वातंत्र्य मिळावं म्हणून आपल्या रक्ताची जी‘रंगपंचमी’ केली तिचा रंग होता त्यागाचा समर्पणाचा. सुर्यास्ताला आकाशात नानाविध रंगाची उधळण रविराज करतो ती आकाशीची‘रंगपंचमी’ आपलं मन मोहून घेते.

आकाशाचा निळा रंग, शेत शिवाराचा हिरवा रंग, खळखळणाऱ्या पाण्याचा पांढरा रंग, फांदीवर फुलणाऱ्या रंगीबेरंगी फुलाचे रंग, फुलाभोवती गुंजन करणाऱ्या भुंग्यांचे रंग, बागेत बागडणाऱ्या चिमुकल्या फुलपाखरांचे रंग, आपल्या अवती भवती ही रंगाची ‘रंगपंचमी’नेहमीच फुलत असते. आपले मन मोहित असते.

मानवी जीवनांत जर प्रेम नसेल, आस्था जिव्हाळा नसेल तर जगणं ही रंगतदार होत नाही. रंगपंचमीच्या सण, त्यातले रंग हे आपल्याला बरचं काही सांगून शिकवून जातात. त्या रंगांनी आपण आपलं जीवन चित्र रंगवून घ्यायचं असतं. रंगाची दुनिया जीवनाला जगण्याला एक नवा अर्थ देते.

‘रंगपंचमी’ खेळताना, दुसऱ्याला रंग लावत असताना आपल्या त्या कृतीने समोरची व्यक्ती सुखावेल, त्याला आनंद होईल हेच पहायला हवे. नैसर्गिक रंग खेळायला हवेत. नवे बाजारी रासायनिक रंग खेळणे धोकादायक आहेत हे समजून घ्यायला हवं. रासायनिक रंगामुळे डोळे चूरचूरतात, त्वचेची आग होते, कातडी खराब होते. तेव्हा असे रंग न वापरणे हेच योग्य नाही का?
आपण प्रत्येकानेच आपले आवडते छंद, कला, नैपुण्य इ. अप्रतिम रंग भरून आपलं जीवन हे रंगदार बनवायला हवं हाच ‘रंगपंचमी’ ह्या सणामागचा संदेश आहे. भक्तीचा रंग, प्रेमाचा रंग, त्यागाचा रंग, एकत्वाचा रंग हे सारे रंग आपणच आपल्या जीवनात भरून घ्यायला हवेत. रंगपंचमी वैर-भाव आकस दूर करणारी, बेरंगी जीवनाला रंगीन बनवणारी अशी आहे.

“पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाये वैसा बने उस जैसा”
ह्या उक्तीप्रमाणे जीवनात रंग भरून ते अधिक मोहक करण्यातच खरा आनंद आहे.

रंगपंचमी हा निबंध – Rangpanchami Marathi Nibandh

होळी नंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रंगपंचमी. या सणाला रंगांचा सण म्हणजेच Festival of colours असेही म्हटले जाते. मार्च एप्रिल मध्ये येणारा हा सण लहान मोठ्या सर्वांना एकत्रित आणून आनंद देऊन जातो.

भारतामध्ये रंगपंचमी असा मला खूप महत्त्व आहे बऱ्याच कालखंडापासून हा सण साजरा होतो.

“नको मारु काना पीचकारी, साडी भिजली रंगाने माझी सारी”

या ओळी वरून असे दिसून येते की श्रीकृष्णाच्या काळात सुद्धा रंगपंचमी हा सण साजरा केला जात होता.
होळी, धुलीवंदन व रंगपंचमी हे सन फाल्गुन महिन्यातील सलग येणारे सण हेत. होळी दहनानंतर दोन-तीन दिवसांनी रंगपंचमी हा सण येतो. या सणांमध्ये सर्वजण एकमेकांवर रंग फेकतात एकमेकांना रंग लावतात. काही लहान मुले मुली पिचकाऱ्या मधून रंगाचे पाणी घेऊन एकमेकांवर मारत असतात. गावामध्ये सर्वजण एकत्र येऊन गाणी गातात, नाचतात व एकमेकांवर रंग टाकतात. हा सण एकमेकांना एकत्रित आणतो. ह्या सणा दिवशी एकंदरीत उत्साही वातावरण असते.
मोठमोठ्या शहरात सुद्धा हा सण साजरा केला जातो. मोठ्या आवाजात गाणी लावून सर्वजण गाण्यांवर नाचतात व एकमेकांवर रंग टाकतात. शहरातील लहान मुले विविध प्रकारच्या पिचकाऱ्या , रंग फेकणाऱ्या बंदुका , रंगाच्या पाण्याने भरलेले फुगे एकमेकांवर टाकतात.
जरी एखाद्याला रंग लावून घेणे आवडत नसले तरीही ‘बुरा ना मानो होली है’ असे म्हणून त्याची समजूत काढली जाते.
होळी किंवा रंगपंचमी साजरी करताना ती पर्यावरणपूरक (Eco friendly) असावी. सध्याच्या काही दिवसांमध्ये अनेक विषारी रंग निघाले आहेत ज्यामध्ये केमिकल्सचा भरपूर वापर केला जातो व त्या लावल्यामुळे त्वचेचे रोग होऊ शकतात, असे रंग स्वस्त मिळतात पण आपण त्याचा वापर टाळला पाहिजे व नैसर्गिक रंग वापरले पाहिजे.
भारतामध्ये रंगपंचमीला जास्त करून चीन वरून रंग येतात ते रंग स्वस्त असतात पण तितकेच घातक असतात आपण त्यांचा वापर टाळला पाहिजे व स्वदेशी रंग वापरले पाहिजेत. शहरातील काही मुले रंगांच्या पाण्याने भरलेले फुगे एकमेकांवर फेकतात, शहरातील बस, रेल्वे यांनी प्रवास करणाऱ्या माणसांवर देखील फेकतात त्यामुळे प्रवाशांना त्रास होतो व ते फेकलेले फुगे तसेच पडून राहतात त्यांचे विघटन होत नाही शहरातील गाई, कुत्री असे भटके प्राणी ते खातात व अनेकदा त्यांचा मृत्यु देखील होतो त्यामुळे आपण शक्यतो रंगपंचमीला कोरडे रंग वापरले पाहिजेत त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही माणसांना देखील त्रास होणार नाही, त्वचेचे आजार होणार नाहीत. कोरडे रंग नैसर्गिक रित्या उगवल्या जाणाऱ्या बीट, हळद यांसारख्या शेती उत्पादनातून तयार होतात त्यामुळे भारतातल्या शेतकऱ्यांचाही फायदा होईल.
म्हणून आज पासून आपण निश्चय करूया की स्वदेशी रंग वापरूनच होळी खेळूया.
जय हिंद..

Essay On Rangpanchami in Marathi

 फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव तसेच होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे ‘रंगपंचमी’.
 ‘रंगपंचमी’ हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात. नाना विविध रंगाची उधळण करायची आणि एका आगळ्या वेगळ्याच स्वानंदाच्या रंगांत रंगून जायचे हे साधायचं असत ह्या सणाच्या साजरेपणात.
रंग.. खरंच प्रत्येक रंगाला एक अर्थ असतो. प्रत्येक रंगाची एक शिकवण असते. पांढरा रंग शांततेचा, लाल रंग त्यागाचा, हिरवा रंग समृद्धीचा. रंगांच्यामुळेच आपले जीवन हे सुद्धा रंगीन होते. गोकुळांत श्रीकृष्णाबरोबर गोप-गोपिकांनी जी रंगपंचमी साजरी केली, त्या रंगपंचमीला होता एक रंग भक्तीचा.आपल्या स्वातंत्र्य वीरांनी, क्रांतीकारकांनी, देशभक्तांनी स्वातंत्र्य मिळावं म्हणून आपल्या रक्ताची जी रंगपंचमी केली तिचा रंग होता त्यागाचा समर्पणाचा.
 सुर्यास्ताला आकाशात नानाविध रंगाची उधळण रविराज करतो ती आकाशाची ‘रंगपंचमी’ आपलं मन मोहून घेते.
 आकाशाचा निळा रंग, शेत शिवाराचा हिरवा रंग, खळखळणाऱ्या पाण्याचा पांढरा रंग, फांदीवर फुलणाऱ्या रंगीबेरंगी फुलाचे रंग, फुलाभोवती गुंजन करणाऱ्या भुंग्यांचे रंग, बागेत बागडणाऱ्या चिमुकल्या फुलपाखरांचे रंग, आपल्या अवती भवती ही रंगाची ‘रंगपंचमी’नेहमीच फुलत असते. आपले मन मोहित करत असते.
मानवी जीवनांत जर प्रेम नसेल, आस्था जिव्हाळा नसेल तर जगणं ही रंगतदार होत नाही. रंगपंचमीच्या सण, त्यातले रंग हे आपल्याला बरचं काही सांगून शिकवून जातात. त्या रंगांनी आपण आपलं जीवन चित्र रंगवून घ्यायचं असतं. रंगाची दुनिया जीवनाला जगण्याला एक नवा अर्थ देते.
 ”रंगपंचमी’ खेळताना, दुसऱ्याला रंग लावत असताना आपल्या त्या कृतीने समोरची व्यक्ती सुखावेल, त्याला आनंद होईल हेच पहायला हवे. नैसर्गिक रंग खेळायला हवेत. नवे बाजारी रासायनिक रंग खेळणे धोकादायक आहेत हे समजून घ्यायला हवं. रासायनिक रंगामुळे
डोळे चूरचूरतात, त्वचेची आग होते, कातडी खराब होते. तेव्हा असे रंग न वापरणे हेच योग्य नाही का?
आपण प्रत्येकानेच आपले आवडते छंद, कला, नैपुण्य इ. अप्रतिम रंग भरून आपलं जीवन हे रंगदार बनवायला हवं हाच ‘रंगपंचमी’ ह्या सणामागचा संदेश आहे. भक्तीचा रंग, प्रेमाचा रंग, त्यागाचा रंग, एकत्वाचा रंग हे सारे रंग आपणच आपल्या जीवनात भरून घ्यायला हवेत.रंगपंचमी वैर-भाव आकस दूर करणारी, बेरंगी जीवनाला रंगीन बनवणारी अशी आहे.
थोड़ा रंग अभी बाकी है, थोड़ा गुलाल अभी बाकी है, क्यों मायूस होते हो जिंदगी के झमेलो से, रंग पंचमी की फुहार अभी बाकी है. रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

10 Lines On Rang Panchami In Marathi

१) रंगपंचमी हा बहुतेक दरवर्षी मार्च महिन्यात साजरा केला जाणारा भारतातील एक महत्त्वपूर्ण उत्सव आहे.

२) रंगपंचमीला मुले, सर्व नातेवाईक तसेच मित्रमंडळी जवळीक येतात.

३) रंगपंचमी साठी लागणारा रंग काही भागात पळसाच्या फुलापासून बनविला जातो, कारण हा नैसर्गिक रंग असतो.

४) रंगपंचमी हा रंगांचा उत्सव असून प्रत्येक रंग एक खास भावना दर्शवितो.

५) मुले ‘पिचकारी’ वापरुन या उत्सवाचा आनंद घेतात आणि एकमेकांवर पाण्याचे रंग फेकतात.

६) लोक एकमेकांच्या चेहऱ्यावर रंग घासतात आणि प्रेम, ऐक्य पसरवतात.

७)  रंगपंचमीच्या आदल्या दिवशी होळी हा सण साजरा केला जातो.

८) रंगपंचमी  लोकांना जवळ आणते आणि असे म्हणतात की रंगपंचमी त्यांच्यातील सर्व समस्या विसरून शत्रूंना मित्र बनवते.

९) रंगपंचमी देशभरात सुसंवाद आणि प्रेम पसरविण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या रीतीरिवाजांनी साजरी केली जाते .

१०) रंगपंचमी हा आनंद, एकत्रितपणा आणण्याचा सण आहे जो सर्व वयोगटातील लोक संपूर्ण उत्साहाने साजरा करतात.

rangpanchmi 2022 nibandh marathi mahiti

होळी, धुलवड आणि रंगपंचमी हे सण महाराष्ट्रात विविध दिवशी साजरे केले जातात. त्यातील रंगपंचमी हा दिवस म्हणजे रंगांचे, विविधरंगी जीवनाचे आणि आनंदाचे प्रतिकच आहे. या दिवशी सर्वजण पिचकारी, रंगांनी भरलेले फुगे, कोरडे रंग आणि रासायनिक रंग वापरून रंगपंचमी साजरी करतात.

रंगपंचमीला खूप पौराणिक संदर्भ आहे. भगवान श्री कृष्ण हे स्वतः रंगपंचमी खेळतात, असे वर्णन आहे. गोपिकांना रंग लावणे आणि त्यांना त्रास देणे हा एक प्रकारे खेळच त्यांनी खेळला होता. राधा व कृष्ण हे प्रतिक स्वरूप म्हणूनच रंगपंचमीला पुजले जातात.

हिंदी आणि मराठी चित्रपटात अनेकवेळा होळीची, रंगपंचमीची दृश्ये दाखवली जातात. त्यावर नृत्यसंगीताचा आविष्कार दाखवला जातो. प्रत्येक पिढीत एखादे तरी गाणे सुप्रसिद्ध होत असते. ऐन रंगपंचमीला एखादा चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर अशी गाणी हमखास चित्रित केली जातात.

प्रत्येक पिढीसाठी रंगपंचमी हा सण वेगवेगळा असू शकतो. शाळेतील मुले, लहान मुले ही धावत पळत, पिचकारी घेऊन, रंग संपले तर पाणी देखील एकमेकांवर ओतून हा सण साजरा करतात. महाविद्यालयीन मुले-मुली कोरड्या रंगांचा वापर करणे जास्त पसंत करतात.

आज मोबाईल आणि सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता रंगपंचमी हा सण देखील सोशल झाला आहे. वास्तविक खेळण्याचा आनंद मिळेल की नाही ते माहीत नाही पण स्टेटस मात्र महत्त्वपूर्ण झाला आहे. त्यासाठी रंगांची दोन बोटे गालावर उठवून खूप लोक मस्तपैकी फोटो अपलोड करत राहतात.

रासायनिक रंग हे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात त्यासाठी आपण कोणत्या प्रकारचा रंग वापरतो, त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. बाजारात खूप प्रकारचे रंग उपलब्ध असतात. नैसर्गिक पद्धतीने, कोणतेही रसायन न वापरता बनवलेले रंग सर्वांनाच उपयुक्त ठरतील आणि त्यांचा मानवी आरोग्यावर काहीही परिणाम होणार नाही.

रंगपंचमी हा खेळ महाराष्ट्रात होळीनंतर पाचव्या दिवशी खेळला जातो. काही ठिकाणी याची पहिल्या दिवसापासूनच सुरुवात होते. असे असले तरी सर्वत्र मांगल्याचे, उत्सवाचे वातावरण मात्र असते. रंग खेळणे हा अति संवेदनशील मनाला भुरळ घालणारा सण आहे.

रंगपंचमी दिवशी कोणीही कोणाला रंग लावला तरी चालते. त्या दिवशी वाईट वाटून घ्यायचे नसते. एकमेकांचा रंग प्रिय व्यक्तींवर बरसला पाहिजे आणि त्यामुळे आनंद व उल्हास हा प्रत्येक वर्षी वाढत गेला पाहिजे अशी त्यामागची भावना असते.

About the author

admin